Devnagri Lipi mhanje Kay | देवनागरी लिपी म्हणजे काय?
देवनागरी लिपी म्हणजे काय?
ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे. आर्य स्वतःला देव मानत. ते नगरात राहत असत. यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी; म्हणून या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी लिपीला ‘बाळबोध’ लिपी असेसुद्धा नाव आहे.
प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तसेच या लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला शिरोरेषा असे म्हणतात.